विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत; ग्रामीण भागातील शाळांसमोर समस्यांचे डोंगर; आर्थिक तरतूदीची बोंब

Schools in rural areas having problem due to less financial support
Schools in rural areas having problem due to less financial support
Updated on

वरठी ( जि. भंडारा ): राज्यातील इयत्ता नऊवी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 23 तारखेपासून सुरू होण्याची शक्‍यता असून त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शाळांना आर्थिक व इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा, शाळेतील वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हॅण्डवॉश, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था, अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवावे, स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत. विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची दररोज थर्मल स्कॅनिंग करावे आदी अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत. 

शाळा, वर्ग दररोज सॅनिटायझिंग करणे, स्वच्छता पुरविणे तसेच इतर साहित्य खर्चिक आहेत. मात्र, शाळांना आता वेतनेतर अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा खर्च कोठून करायचा तसेच गेल्या कित्येक वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे शाळेत शिपाई संख्या खुप कमी आहे. त्यामुळे ही सॅनिटायझिंग, स्वच्छतेची काळजी रोज कशी करणार अशा अनेक समस्या शाळांपुढे आहेत.

शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अट नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे त्यामध्ये एखादा पॉझिटिव्ह असल्या मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत आरोग्य विभागाकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक अजून चाचण्या करू शकले नाहीत. यासारख्या बऱ्याच समस्या शाळांसमोर आहेत. यातही शिक्षण विभाग व प्रशासन कोणताही स्पष्ट आदेश न देता शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहे.

शाळा सुरू करताना अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटायझर व इतर सुविधा सरकारकडून पुरविल्या जाव्यात. तसेच पालकांशी संपर्क साधला असता, बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. कारण वाहतूक व्यवस्था इतर समस्या आहे . त्यामुळे सर्व व्यवस्था शासनाने कराव्यात, अशी मागणी आहे.
- मुकुंद ठवकर
शिक्षक, जिल्हा परिषद शाळा वरठी  

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com