यंदा विवाहांचे शुभमुहूर्त अत्यल्प; आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतिथी

file photo
file photo

शिरजगाव बंड (जि. अमरावती) : तुळशी विवाह झाल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरू होतात. यंदा २० नोव्हेंबरपासून विवाहासाठी मुहूर्त सुरू झाले असून जूनपर्यंत ते चालणार आहेत. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतिथी आहेत.

मे २०२१ या महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने हा महिना लग्नाच्या धामधुमीचा ठरणार आहे. दिवाळी सण झाल्यानंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरूचा अस्त राहणार असल्यामुळे महिनाभर शुभमुहूर्त राहणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात एकूण ११ मुहूर्त असल्याचे वधू-वर पित्याची आतापासूनच लगीनघाई सुरू झाली आहे. गतवर्षी गुरूचा अस्त असतानाही ८६ मुहूर्त होते. मात्र, यावर्षी गुरूचा अस्त लग्नसराईत आल्यामुळे ४६ मुहूर्त आहेत.

लग्नसराईत घरच्यांची धावाधाव

यंदा कर्तव्य असणाऱ्या घरांत दिवाळीपेक्षा लग्नसराईत घाई बघायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षांत गतवर्षीपेक्षा मुहूर्त कमी असल्यामुळे लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय मिळविणे अवघड ठरणार आहे. त्यासाठी आतापासूनच मंगलकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

विवाह मुहूर्ताच्या तिथी

  • नोव्हेंबर : 20,21,23,28,
  • डिसेंबर : 1,2,3,6,8,11,12
  • जानेवारी : 18,20,29,30,31
  • फेब्रुवारी : 1,4,12,14,16,20, 27,
  • मार्च : 3,4,8,11,12,19
  • एप्रिल : 15,16,26,27,
  • मे  : 2,5,6,8,12,14,17, 18, 19, 24,
  • जून : 11, 14, 15

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com