पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय एकात्मता आणि दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणावर सरकारने आपली ठाम भूमिका मांडली. बैठकीला काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी बैठकीनंतर माहिती दिली की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असतानाही ही घटना घडली, याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली. ही घटना मुख्य रस्त्यापासून दोन-अडीच तास दूर, दुर्गम भागात घडली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही सरकारने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.