संप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil

कोल्हापूर - शेतकऱ्यांचा संप दोन दिवसांत मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद झाली. या दोन दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे होते हे तपासा, असे म्हणत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.

शेतकऱ्यांच्या एका गटासोबत चर्चा करून सरकारने 70 टक्के मागण्या पूर्ण करत संप मिटल्याचे जाहीर केले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संप सुरुच असल्याचे जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. संपाविषयी चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला शरद पवार यांचे हात बांधले होते का? शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल, याची पवारांना भिती आहे. संप बंद झाल्यामुळे काहींची दुकाने 2 दिवसांत बंद झाली. यावेळी लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासा. तथाकथित नेत्यांना आणि विरोधकांना संप मिटल्याचे दुःख आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सुख देणे ही संपात फूट कशी? शेतकरी दूध, फळे वाया कसे घालवेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com