पूर्वी चार ते पाच दिवसांत मिळणाऱ्या दाखल्यांसाठी आता मात्र आठ ते पंधरा दिवस थांबावे लगत आहे. प्रभारी तहसीलदारांमुळे शाळाप्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत.
पारनेर (जि. अहमदनगर) : प्रभारी तहसीलदारांमुळे शाळाप्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत. पूर्वी हे दाखले चार ते पाच दिवसांत मिळत असत. मात्र, आता त्यासाठी आठ ते पंधरा दिवस थांबावे लगत आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे किमान शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले तरी वेळेत द्या, अशी मागणी पालकांतून होत आहे.
तालुक्याला नियमित तहसीलदारांची गरज
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीनंतर नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्याकडे प्रभारी पदाचा कारभार सोपविण्यात आला. सध्या शाळा-महाविद्यालयांचे प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी लागणारे विविध दाखले मात्र मिळण्यात मुलांना अनेक अडथळे येत आहेत. वेळेत दाखले मिळाले नाहीत, तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
महाविद्यालयीन प्रवेश तसेच सध्या राज्य लोकसेवा आयोग परीक्षेसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करावयाचे आहेत. त्यासाठी लागणारे नॉन क्रिमिलेअर, ओबीसी तसेच महिलांसाठी लागणारे ३० टक्के आरक्षणाचे दाखले त्वरित मिळाले नाहीत, तर त्यांना अर्ज भरता येणार नाही. तालुक्याचा विस्तार व लोकसंख्याही मोठी असल्याने तालुक्याला नियमित तहसीलदारांची गरज आहे.
जनतेची कामे खोळंबली
तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या सध्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही अद्याप झालेले नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यात प्रभारीराज सुरू आहे. त्यामुळे जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत. तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक कारवी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.