नगर ः कोरोनामुळे शाळा सुरू कधी होणार, याबाबत संभ्रम आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने अभ्यास घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करता यावा म्हणून शालेय पुस्तके घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे.
हेही वाचा ः "सन्माना'पासून हे वंचित
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे चार लाख 18 हजार 113 विद्यार्थी आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या दोन लाख 73 हजार 57, तर सहावी ते आठवीच्या एक लाख 45 हजार 53 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने "बालभारती'कडे 25 लाख 33 हजार 375 पुस्तकांची मागणी नोंदविली. त्यानुसार 24 लाख 52 हजार 71 पुस्तकांचा (97 टक्के) पुरवठा झाला आहे. प्राप्त झालेली पुस्तके तालुका व शाळानिहाय वितरित केली आहे. कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास उशीर लागत असल्यामुळे ही पुस्तके आता विद्यार्थ्यांना घरपोच देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अवश्य वाचा ः नाभिक समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 21 लाख 40 हजार 304 पुस्तके विद्यार्थ्यांना पोच झाली आहेत. त्याची टक्केवारी 87.25 एवढी आहे. शंभर टक्के पुस्तकांचे वितरण होण्यास अजून आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्व शाळांमध्ये पुस्तके वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळापातळीवर कार्यवाही सुरू असून, आतापर्यंत 87.27 टक्के पुस्तकांचे वितरण झाले आहे.
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.