
गुन्हेगारांचा विक्रम नोंदविण्याची व्यवस्था असती तर अकोल्यातील या टोळीचे नाव या विक्रमाच्या यादीत नक्कीच आले असते. टोळीने केलेले कारमाने बघून तुम्हीही अचंबित व्हाल. एक-दोन नव्हे तर चक्क २२ ठिकाणी चोरी करून धान्य पळविल्याच्या घटना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांची टोळी जेरबंद केल्यानंतर उघडकीस आली.
अकोला : गुन्हेगारांचा विक्रम नोंदविण्याची व्यवस्था असती तर अकोल्यातील या टोळीचे नाव या विक्रमाच्या यादीत नक्कीच आले असते. टोळीने केलेले कारमाने बघून तुम्हीही अचंबित व्हाल. एक-दोन नव्हे तर चक्क २२ ठिकाणी चोरी करून धान्य पळविल्याच्या घटना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांची टोळी जेरबंद केल्यानंतर उघडकीस आली. बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात ता. ५ फेब्रुवारीला रविंद्र किसनराव सानप या कान्हेरी सरप येथील शेतकऱ्याने धान्य चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. शेतातील गोदामाचे कुलुप तोडून सोयाबीन व तुरीचा एक लाख ६८ हजार ७४४ रुपयांचा माल चोरीला गेला होता. ही तक्रार दाखल झाल्यानंतर धान्य चोरीच्या इतरही घटनांबाबत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी माहिती घेतली. तेव्हा अनेक गुन्हे या संदर्भात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांना धान्य चोरीच्या तपासासाठी विशेष पथक गठीत करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सपकाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांचे नेतृत्वात पथक गठीत करुन तपास सुरू केला. या पथकाने अल्पावधीतच धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात. हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी यांना घेतले ताब्यात येथे दाखल होते गुन्हे हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ? या पथकाने केली कारवाई अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर अधिक वाचा - भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू |
|||