
सन् २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर सुद्धा महाविद्यालयांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीपासून (दुसरा हप्ता) वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अकाेला : सन् २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर सुद्धा महाविद्यालयांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीपासून (दुसरा हप्ता) वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जातील त्रुटी, विद्यालय-महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा दावा समाज कल्याण विभाग करत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र शिष्यवृत्ती न मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे. शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यालय व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एससी, व्हिजेएनटी, ओबीसी, एसबीसी व मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री शैक्षणिक सत्र २०१८-१९ साठी सुद्धा जिल्ह्यातील नव्याने प्रवेशित व रिनीव्हल विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्री-शिपसाठी अर्ज केले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असला तरी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर सुद्धा सन् २०१८-१९ वर्षाच्या विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना फ्री-शिपच्या रक्कमेची सुद्धा प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे. संबंधित विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने त्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच २०१८-१९ची रखडलेली शिष्यवृत्ती (विद्यार्थी संख्या)
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा महाविद्यालय स्तराव अर्जांना ग्रहण! (संपादन - विवेक मेतकर) |
|||