हिवरखेड (जि.अकोला) ः तेल्हारा तालुक्यातील तलाई या पुनर्वसित गावाचा अंधकारमय लवकरच दूर होणार आहे. येत्या 22 जुलै रोजी आमदार अमोल मिटकरी हे गाव दत्तक घेणार असून, वीज जोडणीसह गावातील मूलभूत सुविधा देण्याचे काम सुरू होणार आहे. विषेष म्हणजे,"कधी होणार तलाई गावाची भलाई' मथळ्याखाली "सकाळ'ने अंधकारमय' तलाई गावाची व्यथा मांडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा अकोल्यात रेल्वे कोच फॅक्टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. ग्रामस्थ आजूबाजूच्या गावात आपला मोबाईल चार्ज करून जगाच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करतात. आज सर्वत्र ऑनलाईन शाळेची चर्चा पाहायला मिळते, मात्र या गावात लाईनच नाही तर ऑनलाईन शाळा घरात कशी भरणार ? असा प्रश्न पडला आहे. ही बाब विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांना कळताच त्यांनी या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या ध्यास घेतला. कधी होणार तलाई गावाची भलाई? अजूनही गावात वीज नाही, अनेक मूलभूत सुविधांचा अभावमहाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गावामध्ये सर्व मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी स्वीकारत गावाला अनेकदा भेटी दिल्यात. गावाच्या समस्यांबाबत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासित केल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
(संपादन- विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.