अकोला ः जिल्ह्यातील कीटकनाशक विक्री केंद्रांमधून घेतलेल्या ५७ कीटकनाशक नमून्यांच्या परीक्षणाचा गुणवत्ता अहवाल अमरावती येथील कीटकनाशक विश्लेषण (चाचणी) प्रयोगशाळेत अडकला आहे. त्यामुळे कीटकनाशकांमध्ये भेसळ व मुळ घटकांचे प्रमाण अधिक वापरून शेतकऱ्यांच्या मस्तकी जहाल कीटकनाशके मारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला अडचणी येत आहेत. अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते. सदर घटनेनंतर यावर्षी सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. यावर्षी बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील रामदास पांडुरंग सोळंके (वय ४७) यांचा फवारणीतून विषबाधा झाल्याने बळी गेला. याव्यतिरीक्त अकोला जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संबंधितांवर सर्वोपचार रुग्णालयात वेळीच उपचार झाल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असे असले तरी आता पिकांच्या मशागतीसह फवारणीचे प्रकार वाढत असल्याने पुढील काळात शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.