अकोला : राजकारणात नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे असे मी मानतो. त्यामुळे आम्ही काँग्रेससमोर कोणत्याही अटी व शर्ती ठेवल्या नाहीत. महाराष्ट्रातील ज्या ७ मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा राहिल त्याठिकाणी वंचितची साथ असेल.
काँग्रेसकडून अद्याप यावर निर्णय आला नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आघाडी करण्याचा तिढा अद्याप सुटू शकला नाही.
त्यामुळे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना आज दि. १९ मार्चरोजी पत्र पाठवून वंचितची भूमिका स्पष्ट केली आहे. १७ मार्चला मुंबईतील भारत जोडो यात्रेच्या समापन महासमारोहात राहूल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी भेट झाल्याचे सांगत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही बैठकीला निमंत्रित न आल्याची खंत व्यक्त केली.
शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठककीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे एकून घेण्यास नकार दिला. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे दोन्ही पक्षांवरील विश्वास उडाला आहे.
फॅसिस्ट, फुटिरतावादी, लोकशाही विरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील सात जागांवर राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी मदत करेल. काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून ७ मतदारसंघाची नावे द्यावीत. त्यांच्या पसंतीच्या या सात जागावर धोरणात्मक पाठिंबा देवू असे आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसला दिलेला प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाहीतर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पत्रपरिषदेला प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जि.प.चे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, प्रमोद देंडवे, नीलेश देव आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी व सेनेसोबत चांगले संबध आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ॲड. आंबेडकर म्हणाले, राजकारणात सगळ्यांसोबत चांगले दिवस पण नसतात व वाईट दिवस पण नाही. राजकारणात सगळेच दिवस सारखेच असतात असेही आंबेडकर म्हणाले. मात्र एका सांगलीच्या जागेच्या प्रश्नाचे उत्तर देताना ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सेनेचे संजय राऊत यांचा चांगलाच पानउतारा केला.
राहूल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेदरम्यान सर्वच विषयावर चर्चा झाली. मात्र राजकारणाविषयी चर्चा होवू शकली नाही असा खुलासाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.