अ‍ॅग्रो

पेरणीची घाई करु नका!; कृषी तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रतिनिधी

नागपूर -  निसर्ग चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत राज्याच्या काही भागात तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस झाला. त्याच पावसावर अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड देखील केली. परंतु यापुढील काळात बुधवार (ता.१७) पर्यंत पावसाचा खंड असल्याने ही लागवड उलटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ७५ ते १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

 जमिनीच्या मगदुराप्रमाणे पेरणी करण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असण्याची आवश्‍यकता राहते. सरासरी १०० मि.मि. पाऊस झाल्यास त्यापुढील काळात पावसाने खंड दिला तर त्या ओलाव्याच्या बळावर बियाण्याची उगवण होऊ शकते. परंतु अल्पसा पाऊस झाल्यानंतर आठवडाभराचा खंड दिल्यास ही रोवणी उलटण्याची भिती राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये. १०० मि.मि. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

सद्या मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर आहे. मॉन्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर विदर्भात पोचतो, असे हवामान तज्ज्ञ सांगतात. परिणामी मुबलक पाऊस झाल्यानंरच पेरणी करावी. पाऊसमान योग्य झाल्यास जमिनीतील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे घाई न करता शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पूर्वी ७० ते ७५ असे पावसाचे दिवस होते. त्यानंतर ६० ते ६५ दिवस पाऊस पडायचा आता ४० ते ४२ दिवसावर मर्यादित झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळ्या कसदार, भारी जमिनीकरिता सरासरी ७५ मि.मि. तर हलक्‍या जमिनीकरिता १०० मि.मि. पावसाची एका आठवड्यात नोंद झाली तरच पेरणी करावी. जमीन, हवेचे तापमान आणि पाऊस (आर्दता) याचे समीकरण जुळल्याशिवाय बियाणे उगवण होत नाही. उगवण झाल्यानंतर पावसाचा हलका शिरवा असल्याशिवाय देखील बियाणे पूर्णपणे उगवत नाही. काही भागात शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर पूर्वहंगामी तूर लागवड केली. 
- विनोद खडसे, कृषी विद्यावेत्ता,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

हवामान खात्याकडून ११ ते १७ जूननंतर पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांनी १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय कापसाची पेरणी करुच नये. यामुळे मोठे नुकसान संभवते. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून मात्र कापूस लागवड झाली आहे. त्यांच्याकडे पाण्याचा स्त्रोत असल्याने धोका कमी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी धोका पत्करू नये.
- पंकज बरडे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

संस्थेने १५ जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशी कापूस लागवडीची शिफारस केली आहे. पेरणीची वेळ साधल्यास कीड नियंत्रण सामूहिकस्तरावर होऊ शकते. लागवडीचा कालावधी वेगवेगळा असल्यास रसशोषक किडी मोठ्या झाडावरुन छोट्या झाडाकडे जात नुकसान करतात. पुरेशी ओल असल्याशिवाय आणि कीडनियंत्रणासाठी १५ जूननंतर लागवड करावी.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT