Fruits Fruits
अ‍ॅग्रो

Agro: संभाव्य मूल्यसाखळ्यांमध्ये अधिक उत्पादन क्षमता

प्रत्येक मूल्यसाखळीसाठी किमान २०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

अपेक्षा फलोत्पादन क्षेत्राच्या : भाग २

नाशिक : राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील द्राक्षे, डाळिंब, केळी, लिंबू, आंबा, खरबूज, काजू, चिंच, सीताफळ, बोर, आवळा, कांदा, टोमॅटो, बटाटा, ढोबळी मिरची, भेंडी, कोबी व फ्लॉवर, फुले, हळद, आले, मिरची, पेरू या प्रमुख पिकांमधून सध्या मिळणारे उत्पन्न ५० हजार ७०३ कोटींच्या आसपास आहे. सध्याची आकडेवारी पाहता, राज्यात फळपिकनिहाय २९५ मूल्यसाखळ्या तयार होऊ शकतात. त्यात दोन लाख ३३ हजार कोटी उत्पन्नाची क्षमता आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने राज्य सरकारला सादर केलेल्या माहितीतून हे चित्र पुढे आले आहे. (Agriculture Fruit Production)

त्रिस्तरीय रचना आवश्‍यक

‘अमूल''च्या धर्तीवर त्रिस्तरीय रचना स्वीकारण्याची आवश्‍यकता आहे. ‘सह्याद्री‘ने मूल्यसाखळ्यांची रचना कशी असू शकेल याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार एका मूल्यसाखळीमागे किमान २० शेतकरी उत्पादक कंपन्या असतील.एका शेतकरी उत्पादक कंपनीत एक हजार शेतकरी असतील. साधारणतः सहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असू शकतील. एका मूल्यसाखळीतून दीड हजार कोटींचे उत्पन्न साध्य करणे शक्य आहे.

प्रत्येक मूल्यसाखळीसाठी किमान २०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. २९५ मूल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी ६० हजार कोटींची गुंतवणूक आवश्‍यक असेल. त्यासाठी पुढील पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.काढणी पश्‍चात सुविधांचे एकात्मिक मॉडेल उभे करावे लागेल.

- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT