Sugar-Factory
Sugar-Factory 
अ‍ॅग्रो

देशातील १९३ कारखान्यांची धुराडी बंद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात यंदाच्या हंगामात ५२४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. त्यापैकी आतापर्यंत १९३ कारखान्यांची धुराडी थंडावली असून, महाराष्ट्र आणि कर्नटकातील आणखी काही कारखाने येत्या काही दिवसांत गाळप थांबवतील, अशी माहिती ‘इस्मा’ने दिली.

यंदा देशात अधिक कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. कारखान्यांना गाळपासाठी ऊस उपलब्ध झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत मागील हंगामात १८.१९ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. त्यात वाढ होऊन यंदा तब्बल २८.१८ दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्येही उत्पादन वाढले आहे. उत्तर प्रदेशात ९.५१ दशलक्ष टन, महाराष्ट्रात १०.१३ दशलक्ष टन आणि कर्नाटकात ३.५६ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे, असेही ‘इस्मा’ने म्हटले आहे.

देणी थकली
देशातील कारखान्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात गाळप केले. परंतु, दर पडल्याने मोठ्या प्रमाणात देणी थकली आहेत. ३१ मार्चपर्यंत देशातील साखर कारखान्यांकडे १६० ते १७० अब्ज रुपये उसाची देणी बाकी होती. महाराष्ट्रात जवळपास २५ अब्ज रुपये देणी बाकी आहेत. बाजारात साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत साखर कारखाने देणी देण्यास असमर्थ आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

निर्यात अनुदान अपुरे
देशातील वाढलेला साखरेचा पुरवठा कमी करण्यासाठी सरकारने निर्यात अनुदान देऊन या हंगामाच्या अखेरपर्यंत, सप्टेंबर महिन्यापर्यंत साखर कारखान्यांना दोन लाख टन निर्यात करण्यास सांगितले आहे. या निर्यात योजनेंतर्गत सर्व साखर कारखान्यांना सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार उत्पादनानुसार साखर निर्यात करायची आहे. यासाठी साखर कारखान्यांना प्रतिटन ३५० डॉलर निर्यात अनुदान मिळणार आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर आधीच पडलेले असताना, हे अनुदान अपुरे असल्याचे व्यापाऱ्यांचे व साखर कारखान्यांचे म्हणणे आहे.

दर पडलेलेच
साखर उत्पानात वाढ झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर होऊन सध्या देशात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३००० रुपयांच्या आसपास घुटमळत आहेत. साखर कारखान्यांना ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्यास साखर उत्पादन करणे परवडेल आणि त्यांना शेतकऱ्यांची देणी वेळेवर देणे शक्य होईल. मात्र, सध्या बाजारात दर कमी असल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT