अ‍ॅग्रो

गारपीट, वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील दोघांचा मृत्यू झाला आहे.  

जुन्नर तालुक्यातील येडगाव- भोरवाडी येथील गोठ्यावर वीज पडून शेतकरी महेश दत्तात्रेय भोर यांचा पहाटेच्या वेळी वीज कोसळल्याने मृत्यू झाला. शिरोली बुद्रुक परिसरातील गावांना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. कांदे काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. ओतूर आणि परिसरातील गावामध्ये वादळी पावसासह गाराही पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नारायणगाव परिसरात मंगळवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने वादळी पाऊस झाला. वीटभट्टी व्यावसायिक, कांदा, आंबा व टोमॅटो पिकांना पावसाचा फटका बसला आहे. पेमदरा वादळी पावसासह गारपीट झाल्याने अनेक कौलारू घरांची कौले फुटली. तसेच फळबागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. 

चिंचोशी (ता. खेड) येथे हरिदास गोकुळे या शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गोकुळे यांच्या पत्नी व अन्य एक महिला यात जखमी झाल्या. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिके व फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कलिंगड, चिकू, केळी, गहू, कडवळ, डाळिंब आदी पिकांना फटका बसला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT