Onion 
अ‍ॅग्रो

तयारी रांगडा कांदा लागवडीची...

डाॅ. एस. एम. घावडे

रांगडा कांदा लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी. गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करावी. साधारणपणे सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात ३० ते ४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. गादीवाफ्यावर रोपांची पुनर्लागवड केल्याने चांगली वाढ होते.

कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच जमिनीचा  सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीत चुन्याचे प्रमाण १० टक्‍क्यांपेक्षा जास्त असणारी, पिवळ्या मातीचे थर असणारी तसेच चिबड जमीन कांदा उत्पादनासाठी टाळावी.

जानेवारी ते मार्च या काळात उशिरा खरिपातील म्हणजेच रांगडा कांदा बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. रांगडा कांदा लागवडीपासून दर्जेदार उत्पादन मिळते. प्रतिहेक्टरी दहा किलो बियाणे लागते. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी नसावी. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम दोन  ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेत गादीवाफ्यावर बियाणे हे साधारणतः अर्धा ते एक सेंटिमीटर खोलीवर पेरावे. मातीमिश्रित बारीक शेणखत किंवा गांडूळ खताने झाकून त्यावर हलकेसे पाणी द्यावे. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी  गादीवाफ्यात शेणखत मिसळावे. तसेच, प्रतिचौरस मिटर क्षेत्राला दोन ग्रॅम नत्र, १ ग्रॅम स्फुरद आणि १ ग्रॅम पालाश ही खत मात्रा द्यावी. 

साधारणतः सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात ३० ते ४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड केली जाते. रोप काढणीपूर्वी रोपवाटीकेत हलकेसे पाणी द्यावे. जेणे करून रोपांच्या मुळांना कमी इजा होईल. रोपस्थानांतरण दरम्यान रोपांचे एक तृतीआंश शेंडे कापावेत, जेणेकरून रोपे शेतामध्ये योग्य रीतीने रुजण्यास मदत होईल.

रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान (२ मि.लि. प्रतिलिटर पाणी) आणि कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या द्रावणात दोन तास बुडवून ठेवल्याने फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.  रूंद सरी वरंबा पद्धत ही कांदा लागवडीसाठी सपाट जमिनीपेक्षा पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य ठरते. लागवडीसाठी १२० सें.मी. रुंदीचा गादीवाफा करावा. गादीवाफ्यावर १० सें.मी. बाय१० सें.मी. अंतराने लागवड करावी.

खत व्यवस्थापन 
हेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत किंवा ४ ते ५ टन गांडूळ खत मिसळावे.
रासायनिक खताची मात्रा - १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ३० किलो सल्फर प्रतिहेक्टरी द्यावे. नत्राची मात्रा तीनवेळा विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीच्या वेळी (५० किलो/हे.), दुसरी मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी (५० किलो/हे.) व तिसरी मात्रा लागवडीनंतर ४५ दिवसांनी (५० किलो/हे.) द्यावी.

ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. विद्राव्य खतमात्रासुद्धा पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते. लागवडीनंतरच्या नत्राच्या २/३ मात्रा ही आपण रोप स्थलांतरानंतर ६० दिवसापर्यंत आठवड्याच्या अंतराने देऊ शकतो. 

- डाॅ. एस. एम. घावडे - ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT