ST bus
ST bus sakal media
अहमदनगर

अहमदनगर : एसटीच्या १७१ कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने आता कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीला निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने, बडतर्फीची कारवाई आता प्रशासनाने सुरू केलेली आहे. आजअखेर एकूण १७१ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे ४८ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सध्या एसटीचे एकूण तीन हजार ७४३ कर्मचारी आहेत. त्यातील २९० जणांवर निलंबनाची, तर १७१ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई मोहीम अशीच सुरू राहणार आहे. अजूनही जिल्ह्यातील सुमारे ३८ जणांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या, तरी प्रवाशांचेही हित कर्मचाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे.

१८० बसच्या माध्यमातून ३५० फेऱ्या

जिल्ह्यात सध्या १८० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे. १८० बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर दिवसभरात सुमारे ३५० फेऱ्या होत आहेत. त्यातून एसटीला चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT