bus sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : दिवाळीसाठी एसटीच्या जादा ९५ बस

गैरसोय टाळण्यासाठी नियोजन : १० टक्के भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाने जादा ९५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना मात्र १० टक्के भाडेवाढीचा फटका बसणार आहे.

दिवाळी व भाऊबी‍जेनिमित्त सुट्या असल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे अहमदनगर विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज, यंत्र अभियंता नगराळे, विभागीय वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे, सहायक वाहतूक अधीक्षक चंद्रकांत खेमनर यांनी जादा बस गाड्यांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून ९५ जादा बस सोडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अकराही आगारांतून पुणे येथे ये-जा करण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बस आजपासून (बुधवार) ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतील. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ केली आहे.

ही भाडेवाढ गुरुवार (ता. २०) मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी अवैध प्रवासी वाहनांतून प्रवास करणे टाळावे.

- मनीषा सपकाळ, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, अहमदनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंब्रात इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना, एका महिलेचा मृत्यू

PKL 2025 : एकटा अयान पुणेरी पलटनवर पडला भारी! पटना पायरेट्सचा ४८-३७ ने नोंदवला स्पर्धेतील पहिला विजय

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणावरून भुजबळांची नाराजी कायम...मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार?

4 अपत्ये जन्माला घाला, करमुक्त व्हा; लोकसंख्या घटल्यानं ग्रीसच्या पंतप्रधानांची घोषणा, १६ हजार कोटींची तरतूद

वेगळं राहण्यासाठी लग्न केलंय का? प्रसाद जवादे वैतागला; पत्नी अमृता देशमुख समजूत काढत म्हणाली-

SCROLL FOR NEXT