अहमदनगर: बुरुडगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ स्वस्थ बसणार नाहीत. जलवाहिनीचे काम तातडीने सुरू न झाल्यास ३१ मे रोजी आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच बापूसाहेब कुलट यांनी दिला आहे.
आयुक्त शंकर गोरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. बुरुडगावला पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने येथील महापालिकेच्या कचरा डेपोला २०१९ मध्ये ना हरकत दिली होती. मात्र, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बुरुडगावला पाणी देण्याचा विचारच केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी ५ एप्रिल रोजी कचरा डेपोला टाळे ठोकले. दुसऱ्या दिवशी आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर, माजी महापौर यांनी बुरुडगाव ग्रामसभेत हजेरी लावली.
ग्रामपंचायतीकडे ४ कोटी रुपये वर्ग करतो, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले. मात्र ग्रामसभेने ते मान्य न करता, महापालिकेनेच फुलसौंदर संपवेल ते बुरुडगाव कचरा डेपोपर्यंत पाइपलाइन पूर्ण करून द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी आयुक्त गोरे यांनी, २५ एप्रिलपर्यंत कामाला सुरवात करण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता ३० मेपर्यंत पाइपलाइनच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली नाही, तर ३१ मे रोजी आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा बापूसाहेब कुलट व ग्रामस्थांनी दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.