Bharati Pawar Team eSakal
अहिल्यानगर

अहमदनगर: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार घटनास्थळी दाखल

अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात आग लागल्यानं ११ रुग्णांचा मृत्यू झाला.

सुधीर काकडे

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आज सकाळी घडेलेल्या एका घटननेनं सध्या संपुर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेत आयसीयु विभागात लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या सध्या अहमदनगरमधील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात आग (Ahemadnagar Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या कोविड विभागातील आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी असल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेनं आज अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना एकुण ७ लाखांची मदत मिळणार आहे. भारती पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. तसेच या प्रकरणावरून आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान मोदींचा भावनिक सूर! नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

काँग्रेसचा उमेदवार मॅनेज? कोट्यवधींच्या घोडेबाजाराचा आरोप, स्थानिक नेते संतप्त, दिवसभरात नेमकं काय घडलं?

DGP Sadanand Date : ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी मोडून काढू

नगर पंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग; फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार मुदत; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागणार?

IND vs SL Test: भारतीय संघ ९ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी खेळणार! कधी होणार सामने? तारखेबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT