अहिल्यानगर

अहमदनगर : आधी मुलीला संपवलं, नंतर आई-बापांनी केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

- अशोक तांबे

अहमदनगर : कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केडगावमध्ये घडली आहे. पती, पत्नी आणि मुलीने कर्जाला कंटाळून आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक पोहचलं आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुर्घटनास्थळावर सुसाईड नोटही आढळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव येथील एकाच कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत आढळून आले आहेत. आई वडीलांनी दहा वर्षाच्या मुलीला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यात आईवडीलांसह लहान मुलीचा समावेश आहे. केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर ठुबे मळा येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडला. संदिप दिनकर फाटक, (वय 40), किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10 ) अशी मयतांची नावे आहेत. फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

संदीप फाटक हे सारोळा कासार येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून केडगाव येथे राहत होते. एका कंपनीची एजन्सी त्यांच्याकडे होती. किराणा दुकानात साहित्य पोहोचवण्याचे काम करत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. व्यावसायात हवं तसं यश मिळत नव्हतं. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT