Ahmednagar Quality education essential competition  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : स्पर्धेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक

सुहास निंबाळकर; डाकले जैन महाविद्यालयात एकदिवसीय चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : सध्याचे युग माहिती, तंत्रज्ञान, संशोधन व स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवरील बदलते तंत्रज्ञान व नवनवीन संकल्पना समजून घ्याव्यात. स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात संगणक विभाग व अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात वापर, या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. निंबाळकर बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते अर्चना निगडे, अश्विनी ढोकणे, योगीराज चंद्रात्रे, विवेक मोरे उपस्थित होते.

अर्चना निगडे म्हणाल्या, की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रात्यक्षिक ज्ञान हे गुण आत्मसात करावेत. अश्विनी ढोकणे यांनी मुलाखतीसाठी जाताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान व अनुभव आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, वाणिज्य व संशोधन विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कळमकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिक सय्यद, अशोक नाबगे, डॉ. बापूसाहेब घोडके उपस्थित होते. प्रास्ताविक रोहिदास लांडे यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री भावसार यांनी केले. आभार पुष्कर जोशी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT