anna hazare Google
अहिल्यानगर

मंदिरे बंद करून सरकारने काय मिळवले? अण्णा हजारेंचा संतप्त सवाल

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (जि. नगर) : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे, दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडलेली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का, सात्विक विचारातून माणसे घडत आहेत, अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले, असा संतापजनक सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल, अशी ग्वाही हजारे यांनी दिली, अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली.

अहमदनगर येथील मंदिर बचाव समितीने हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी मंदिरे उघडण्यासाठी समितीने अण्णांना साकडे घातले. या वेळी मंदिर बचाव समितीचे प्रमुख वसंत लोढा, सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले की, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे, ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज माझे ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर आजवर कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले. त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलून लवकर मंदिरे उघडावीत, अशा शब्दांत हजारे यांनी सरकारला सूचना केली आहे. मंदिर बचाव कृतीसमितीचे वसंत लोढा यांनी यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनाची माहिती देऊन पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT