Court notice to resident Pipada couple 
अहिल्यानगर

राहात्याच्या पिपाडा दाम्पत्यांना खंडपीठाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

राहाता ः पालिकेचा कारभार करताना हयगय व गैरवर्तणूक केल्याबद्दल नगराध्यक्ष ममता पिपाडा व स्वीकृत नगरसेवक डॉ. राजेंद्र पिपाडा यांना पदावरून दूर करण्याबाबतचा अहवाल तत्कालीन मुख्याधिकारी असिमा मित्तल यांनी राज्य सरकारला पाठविला होता. त्यावर राज्य सरकारने काय कारवाई केली. 

या बाबत माजी नगरसेवक राजकुमार अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यावरून खंडपीठाने राज्य सरकार व पिपाडा दाम्पत्याला नोटिसा बजावल्या आहेत. 

नगरपरिषद कायदा अधिनियम 1965च्या कलम 55(अ) नुसार पिपाडा दाम्पत्याला पदावरून दूर करण्याचा अहवाल तत्कालीन मुख्याधिकारी मित्तल यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पाठविला होता.

त्यावर अद्याप कारवाई न झाल्याने माजी नगरसेवक अग्रवाल यांनी ऍड. एल. व्ही. संगीत यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने 11 फेब्रुवारी रोजी राज्य सरकार व पिपाडा दाम्पत्याला नोटिसा बजावल्या. पुढील सुनावणी 10 मार्च रोजी होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

Balewadi News : पदपथावर बेकायदेशीर कूपनलिका (बोअरवेल) खोदकाम? जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT