ahmednagar esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

मुरलीधर कराळे

अहमदनगर : शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या आदेशान्वये नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारींनी दिले आदेश

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाने घालवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होऊ नये, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून समाजात तेढ निर्माण होऊ नये, याबाबत मंडळांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, मोर्चे, आंदोलने करू नये, रास्ता- रोकोही करता येणार नाही. यासाठी जमाबवंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे, मिरवणूक काढणे, लाठ्या-काठ्यांसह शस्त्र बाळगणे, घोषणा देणे, प्रक्षोभक भाषण करणे यावर बंदी आहे. अंत्यविधी, लग्न समारंभ यासाठीही काही नियमावली केली आहे. हा आदेश (ता. २४) सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

२४ सप्टेंबरपर्यंत लागू

कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान सुमारे अडीच हजार पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक हजार होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक कंपनी तसेच इतर कुमक मागविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात खबरदारीसाठी प्रशासनाने तयारीकेली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.गणोशोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT