Damage to farmers due to lightning strike at Kauthe in Shrigonda taluka 
अहिल्यानगर

पडत्या पावसात कांद्याच्या वखारीवर वीज पडली अन्‌ क्षणात शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यातील कौठे येथील शेतकरी चंद्रकांत अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मोठ्या कष्टातून पिकलेल्या कांद्याला अजून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र या  वखारीवर शनिवारी रात्री वीज पडून कांद्याचे मोठे नुकसान झाले. वीज पडल्याने कांद्याची निम्मी वखार जळाली तर राहिलेली वखार पावसाच्या पाण्यात खराब झाली.

सध्या कांद्याला चांगला बाजार असल्याने शेतकरी खुश आहे. मात्र अजून बाजार वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने वाखारीत साठवलेला कांदा काही दिवस ठेवून नंतर पैसे करून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

कौठे येथील शेतकरी सूर्यवंशी यांनी सुमारे ५०० गोणी कांदा असाच वखारीत साठवून ठेवला होता.  शनिवारी रात्री तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसात सूर्यवंशी यांच्यावर वखारीवर वीज पडली. त्यामुळे कांद्याच्या वखारीवरील प्लास्टिक कागद व त्याखालील निम्मा कांदा विजेच्या आगीत सापडला.

शिवाय रात्रभर पाऊस सुरु असल्याने राहिलेला कांदा पाण्याने खराब झाला. त्यामुळे सूर्यवंशी यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाचे निसर्गानेच नुकसान केले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी भावना कौठे येथील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT