पाणीयोजन.
पाणीयोजन. 
अहमदनगर

कोपरगावात चार तलाव असूनही आठवड्यातून एकदाच मिळतंय पाणी

मनोज जोशी

कोपरगाव (नगर) : कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पालिकेच्या चारही साठवण तलावात पाणी शिल्लक असताना शहराला मात्र ऐन पावसाळ्यातदेखील आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. पावसाळ्यात पालिकेने नागरिकांना किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने ब्रिटिशांनी दारणा धरण बांधले. त्यातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याने तालुक्याचे शेती व पिण्याच्या पाण्याचे तीन तेरा वाजले आहे. पिण्याच्या पाण्याचे देखील वारंवार हाल होत आहेत. शहराला कायम पाच ते सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण चांगले असून उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण आणि  जायकवाडी देखील भरली आहे. मात्र अजून ही शहरवासीयांच्या हालपेष्टा संपल्या नाही. अजून ही आठवड्यातून एकदाच नळाला पाणी येते. त्यावर ही कोणी  बोलण्यास तयार नसून सर्वत्र शुकशुकाट आहे. कुठलीही बैठक, निर्णय, कोणतेही नियोजन नाही.

सध्या पालिकेकडे चार तलावात पाणी साठवले जात आहे. साठवण तलाव क्र.एकमध्ये 6 फुट 8 इंच ,तलाव क्र. दोनमध्ये 3 फुट, तलाव क्र. तीन मध्ये 5 फुट तर चार नंबर तलावात 6 फुट 3 इंच पाणी शिल्लक आहे. परवापासून पाटबंधारे विभागाने कालव्यातून पिण्याचे आवर्तन सोडले असून आधी वैजापूर नगरपालिकेचे तळे भरून देण्याचे काम सुरु असून त्यानंतर कोपरगाव पालिकेला पाणी मिळणार आहे. एकंदरीत पाणी शिल्लक असताना नागरिकांची पाण्यासाठी ससेहोलपट का असा सवाल केला जात आहे. किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोपरगाव नगरपालिका येथील पाणी पुरवठा विभागातील अभियंता ऋतुजा पाटील म्हणाले, पाटबंधारे विभागाकडून पुढील पाण्याचे आवर्तन कधी मिळणार यावरून शहराचे आवर्तन किती दिवसाआड हे ठरत असते. चार ही तळ्यातील पाणी दोन महिनेसुद्धा पुरत नसल्याने त्याबाबत चर्चा करून पाटबंधारेचे पुढील आवर्तन लक्षात घेऊन सर्वानुमते निर्णय घ्यावा लागतो. अजून तरी पाण्याचे दिवस कमी करण्याबाबत निर्णय झालेला नाही. शहरातील बोगस नळधारकांविरुद्ध  स्टिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असून त्याबाबत सर्व्हेक्षण सुरु आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT