Digital-Satbara 
अहिल्यानगर

Ahmednagar | डिजिटल उताऱ्यात जिल्हा अव्वल

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना यावर्षी डिजिटल सात-बारा उतारा घरोघरी जाऊन मोफत वाटप केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना यावर्षी डिजिटल सात-बारा उतारा घरोघरी जाऊन मोफत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांपैकी ५५१ गावांमध्ये महात्मा गांधी जयंतीपासून (ता. २) प्रारंभ झाला आहे. ३७ हजार ५०० सात-बारांचे वाटप करण्यात आले आहे. १४ लाख पाच हजार ५०० कृषी खातेदारांपैकी साडे तीन लाख सात-बारा उताऱ्यांचे पी.डी.एफ. पूर्ण झाले असून राज्यात नगर जिल्हा पहिल्या क्रमांकार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आदींसह महसूल अधिकारी उपस्थित होते. सात-बारा उतारा पाहिजे असल्यास तलाठ्यांना रेकॉर्ड पासून स्वत हस्ते सात-बारा उतारा लिहून द्यावा लागत होता. या पद्धतीने उतारा देण्यासाठी खूप वेळ लागत होता. महसूल विभागातील रेकॉर्डचे अद्ययावत करण्याची मोहिम राज्य शासनाने सुरू केली आहे. सर्व सात-बारा उताऱ्यांचे डिजिटल केले जाणार आहेत. त्यामुळे संगणकाच्या सहाय्याने तात्काळ सात-बारा उतारा देणे शक्‍य होणार आहे. जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यांचे डिजिटल करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी खातेदार शेतकऱ्यांना डिजिटल सात-बारा उतारा घरपोहच मोफत दिला जाणार आहे. या उताऱ्यासमवेत अभिप्राय नोंदविण्यासाठी फॉर्म दिला जाणार आहेत. शेतकऱ्यांना आपला सात-बारा उतारा पाहून क्षेत्र, नाव आदींमध्ये काही दुरूस्ती करण्यासाठी हा अभिप्राय फॉर्म भरून द्यायचा आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त मोफत सात-बारा उतारे वाटपास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांपैकी ५५१ गावांमध्ये प्रारंभ झाला आहे. ३७ हजार ५०० सात-बारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. जमावबंदी आयुक्‍तालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोफत सात-बारा उतारा देण्यासाठी पी.डी.एफ. करावे लागत आहेत.१४ लाख पाच हजार ५०० कृषी सात-बारा उताऱ्यांपैकी साडे तीन लाख सात-बारा उताऱ्यांचे पी.डी.एफ. पूर्ण झाले आहे.

दीड महिन्यात सर्वांना सात-बारा

महसूल विभागीय आयुक्‍तांनी मोफत सात-बारा वाटपाचे काम ता. १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्या दीड महिन्यांना सर्वांना सात-बारा उतारे मिळणार आहेत. या उताऱ्यामध्ये चुका झाल्यास असल्यास दुरुस्ती करण्यास संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT