अहमदनगर : केंद्र सरकारने चारचाकी वाहनांना 'फास्टॅग' लावण्याची सक्ती केली आहे. ते न लावल्यास वाहनचालकांना 'टोल'नाक्यावर दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे 'फास्टॅग' मिळविण्यासाठी वाहनचालकांची धावपळ सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील 'टोल'नाक्यांवर चारचाकी वाहनांचे 'फास्टॅग' पाहून 'टोल'वसुली सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातील सहा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, यातील केवळ कल्याण-विशाखापट्टण रस्त्याचेच काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) व बडेवाडी (ता. पाथर्डी) येथील 'टोल'नाक्यांवर 'फास्टॅग'द्वारे 'टोल'वसुली केली जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जिल्ह्यातील राज्य महामार्गांवरील 'टोल'नाक्यांवर 'फास्टॅग' व रोख, अशा दोन्ही स्वरूपांत 'टोल'वसुली सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारने सर्वच चारचाकी वाहनांना 'फास्टॅग' लावणे सक्तीचे केले आहे. न वापरल्यास दुप्पट 'टोल'आकारणी करण्यात येणार असल्याने, वाहनचालकांनी 'फास्टॅग' नोंदणीसाठी धावपळ सुरू केली आहे. सध्या बॅंक अथवा संबंधित 'टोल'नाक्यांवर 'फास्टॅग' नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
'फास्टॅग' नसलेल्या चारचाकी वाहनांना दुप्पट 'टोल' लावण्यात येत आहे, तर 'फास्टॅग' असूनही बॅंक खात्यात रक्कम शिल्लक नसलेल्या वाहनचालकांना 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकण्यात येत आहे.
- प्रफुल्ल दिवाण, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.