Ecofriendly Ganeshotsav for 230 students of Balpan School
Ecofriendly Ganeshotsav for 230 students of Balpan School 
अहमदनगर

‘बालपण’च्या 230 विद्यार्थ्यांचा पर्यावरणाची जागृती करणारा गणेशोत्सव

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पानोडी व आश्वी खुर्द येथील ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्थेच्या बालपण स्कूलमधील विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी केलेल्या पर्यावरण जागृतीच्या संस्काराचा परिणाम म्हणून, विद्यालयातील सुमारे 230 विद्यार्थ्यांनी स्थानिक साहित्यातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करुन त्यांची आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा केली आहे.

बालपण विद्यालयात शालेय अभ्यासक्रमाव्यतिरीक्त पर्यावरणाबद्दल जनजागृती, वृक्षारोपण आदींचे महत्व बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्याचे, संस्कार करण्याचे काम सुमारे तीन चार वर्षांपासून सुरु केले आहे. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. या कठीण काळातही रक्षाबंधनाचा सण पर्यावरण पूरक राख्या तयार करुन विद्यार्थ्यांनी साजरा केला. याशिवाय वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचे धडे गिरवले. या वर्षीचा गणेशोत्सवही आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरवून संस्थेच्या प्रशासनाने त्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना याबाबत मार्गदर्शन केले. 

गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवानंतर नदीपात्रात न विरघळलेल्या पीओपीच्या मूर्तींचा खच पडला होता. पर्यावरणाची हानी करणाऱ्या विद्रुपीकरण झालेल्या मूर्तींचे रंग व इतर रासायनिक साहित्यामुळे जलप्रदुषण झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना देत, यावर मार्ग काढण्यासाठी त्यांच्याच मदतीने यावर शक्य त्या उपाययोजना करण्याचे ठरवले. 
या वर्षी शिक्षकांनी मार्गदर्शन करुन शाडू मातीऐवजी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारी शेतातील काळी व लाल मातीचा वापर करुन, गणेशमूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला.

विश्व पर्यावरण परिषदेचे अध्यक्ष प्रा. गणेश चन्ना व सचिव अनमोल शर्मा यांच्या मार्गदर्शनातून पर्यावरणपूरक गणपती साकारण्यात आले. स्थानिक साहित्यातून मुळात निराकार असलेल्या गणेशाची आपल्या मनातील रुपे सुमारे 230 विद्यार्थ्यांनी साकारली. पानाफुलांच्या वापरातूनसजावट करण्यात आली. या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करुन, त्यांचे विसर्जनही घरातच कुंडीत करुन त्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या शाळेच्या परिसरातील सुमारे 15 ते 20 गावातील विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांची पर्यावरणविषयक जागृती वाढल्याची माहिती बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे यांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT