Farmers got good yields of turi
Farmers got good yields of turi 
अहमदनगर

शेतकऱ्यांना यंदा तुरीने तारले, भरघोस उत्पन्न

राजू घुगरे

अमरापूर : अतिवृष्टीमुळे यंदा कपाशीच्या पिकाला चांगला फटका बसला असला तरी तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आधार दिला. सध्या तुरीच्या मळणीचा हंगाम सुरु असून तुरीच्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीला यंदा अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. कपाशीचे उत्पन्न निम्याने घटले. तालुक्‍यात 41 हजार हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. त्या खालोखाल 23 हजार हेक्‍टर क्षेत्र तुरीच्या पिकाखाली होते.

पावसाळ्यात तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने कपाशीची वाढ खुंटली, बोंडे काळे पडून सडली. वेगवेगळ्या रोगांमुळे कापसाची झडती कमी झाली. कापशीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही एकरी अवघा चार ते पाच क्विंटल कापूस हाती आल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले.

अनेकांनी कपाशी उपटून त्या जागी इतर पिकांची पेरणी केली. अनेक शेतकरी पाणी उपलब्ध असल्याने तुर काढून गहू, हरभरा, ऊस याचीही लागवड करणार असल्याने त्यांना दोन्ही हंगामात चांगले उत्पन्न मिळून हातभार लागणार आहे. 

अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT