Farmers have not yet received compensation 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे सर्व हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा देत, तातडीने नुकसानीची पाहणी व पंचनामे करूनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. शेतमालाची विक्री करता न आल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत, शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, अपार कष्ट घेत पिके उभारली. मात्र, त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली.

अतिवृष्टीमुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्षे, डाळिंबासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अकस्मात संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी व महसूल विभागासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. 

संबंधित विभाग व प्रशासनाने वस्तूनिष्ठ पंचनामेही केले. शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, दिवाळी होऊन महिना झाला, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही पदरात न पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT