Farmers in Sangamner taluka have not received compensation 
अहिल्यानगर

अवकाळीच्या नुकसान भरपाई पासून शेतकरी अद्यापही वंचितच

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने राज्यात धुमाकुळ घातला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने सर्व हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना दिलासा देत तातडीने नुकसानीची पहाणी व पंचनामे करुनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

या वर्षी मार्च पासून कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव सुरु झाला. यामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. त्यामुळे उपलब्ध शेतमालही विक्री करता न आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थिवर मात करीत अपार कष्ट घेवून पिके उभी केली. मात्र त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली.

अतीवृष्टीसह अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्षे, डाळींब या सारख्या पिकांचे आतोनात नुकसान झाले. या अकस्मात संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी व महसुल विभागासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. संबंधित विभाग व प्रशासनाने त्यांच्या आदेशाप्रमाणे वस्तुनिष्ठ पंचनामेही केले. 

शासनाने या संकटातील शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र दिवाळी होवूनही महिना उलटून गेला असला तरी, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही पदरात न पडल्याने नाराजी निर्माण झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ''रस्त्यावरील सर्व श्वान हटवण्याचे आदेश दिलेले नाहीत'', सुप्रीम कोर्टाने दिलं स्पष्टीकरण

Ahilyanagar News : "पुस्तक, निसर्ग आणि माणूस वाचणे आयुष्यभर आवश्यक"– युवा साहित्य संमेलनात मनोज बोरगावकरांचे विचारमंथन!

Viral News : चोरांवर भारी पडली मुंबईची नारी ! पोलिसांनी हात झटकले पण अंकिताने वाराणसीत शोधला चोरी गेलेला फोन, सोशल मीडियावर होतेय कौतुक

Nashik Municipal Election : पॅनलमध्येच दगाफटका? नाशिक मनपा निवडणुकीत उमेदवारांना आता 'क्रॉस वोटिंग'चे टेन्शन

EPFO कडून ट्रान्सजेंडर समुदायाला ऐतिहासिक दिलासा! नाव-लिंग बदल आता अडथळ्याविना होणार, नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT