Jagannath Bhor sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : जलसिंचनाबाबत चितळे आयोगासाठी लढा ; जगन्नाथ भोर

जिल्ह्यात फक्त २७ टक्के क्षेत्र हे जलसिंचनाखाली आहे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जलसिंचनाबाबत चितळे आयोगाने १९९९ साली सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात करणे गरजेचे आहे. या उपाययोजना राबविल्यास त्याचा ७४ गावांना फायदा होणार आहे. परिणामी दक्षिणेतील ५० टक्के भाग ओलिताखाली येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोर म्हणाले की, जिल्ह्यात फक्त २७ टक्के क्षेत्र हे जलसिंचनाखाली आहे. ७३ टक्के जिल्हा कोरडवाहू व दुष्काळी आहे. जिल्ह्याच्या दक्षिण विभागात वारंवार पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे शेतीचा व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी हवालदिल होतात. पाण्याचे नियोजन करुन भविष्यात जिल्हा हरित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत, असे ते म्हणाले. आपल्या या कामाला चार ते पाच संघटनांसह सेवेत असलेल्या काही अधिकाऱ्यांचीही साथ असल्याचे ते म्हणाले.

भोर म्हणाले की, कालव्यामधून जोड असणारे चार ठिकाणे आहेत. यामध्ये तुकाई योजना- चोंडी (सीना), साखळाई योजना- नगर व श्रीगोंदा, घोसपुरी योजना- नगर व पारानेर, श्रीगोंदे, सीना जोड प्रकल्प- पिंपळगाव जोगा, नारायणगव्हाण कुकडी, कालव्यामधून थेट उचल-शहांजापूर येथे तसेच हंगा नदी, वालुम्बा नदी व सीना नदी, हंगा नदी जोड प्रकल्प- पिंपळगाव जोगा कालवा शेवट ते दशाबाई डोंगर पारनेर, कान्हूर पठार, हंगा नदी आदी ठिकाणी नियोजन करता येईल. यातून चितळे आयोगाने दिलेल्या अहवालानुसार या सर्व योेजना पूर्णत्वासाठी आगामी काळामध्ये आपण गावागावांत जाऊन नियोजन करणार असल्याचे भोर म्हणाले.

महाराष्ट्रात कमी पाऊस पडणारा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. अकोले तालुका वगळता जिल्ह्यात मराठवाड्याच्या सरासरी निम्माच पाऊस पडतो. त्यामुळे जिल्हावासीयांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

जलसिंचनाची गरज या तालुक्यांना

जिल्ह्यातील नगर तालुका, कर्जत, श्रीगोंदा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी हा परिसर सर्वाधिक उंचवट्यावरील आहे. त्यामुळे या ठिकाणी तर सर्वात कमी पर्जन्यमान असते. त्यामुळे जलसिंचनाची सर्वाधिक गरज अहमदनगरच्या दक्षिण भागाला आहे, असेयावेळी जगन्नाथ भोर यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींशी चर्चा

या प्रश्‍नावर खासदार व आमदारांशी चर्चा झालेली आहे. सर्वजणांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेला आहे. हे पाणी आणण्यासाठी आता लोकचळवळ उभारण्याची गरज आहे. जनरेट्यापुढे कोणतेही सरकार असले तरी ते यासाठी सहकार्य करील, असे जगन्नाथ भोर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT