नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे फूलउत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. त्यामुळे दिवाळीत फूलबाजार चांगलाच फुलला आहे. फुलांना सध्या दरही चांगला मिळत आहे. एरवी फुलांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. यंदा मात्र त्याचे सोने झाले. असे असले तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांमुळे आसू आणि हासू अशी अवस्था आहे.
यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवात जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले. दसरा- दिवाळी डोळ्यासमोर ठेवून बागायतदार शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. मात्र, ऐन नवरात्रोत्सवात झालेल्या पावसामुळे, काढणीस आलेली फुले खराब होऊ लागली.
शेतकऱ्यांच्या हाती नेहमीपेक्षा कमी पीक आले. शिवाय, पुरेसा भावही दसऱ्याच्या वेळी मिळाला नाही. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. बाजारपेठेतही फुलांना मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. शहरातील मार्केटयार्डमध्ये आज सकाळपासूनच फुलांची मोठी आवक झाली.
फुलांचे दर (किलोप्रमाणे)
झेंडू - 100 ते 150
शेवंती - 250
अस्टर - 250 ते 300
गुलटोप - 150 ते 200
गुलाब - 300 (सुटा)
गुलछडी - 500
तुळजापुरी - 100 ते 120
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.