Follow up with the Central and State Governments to change the criteria in the Fruit Crop Insurance Scheme 
अहिल्यानगर

फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार : विखे

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळबाग उत्पादकांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहिजे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी, केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कनोली येथे कुटुंबीयांना शासन मदतीचे धनादेश विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वर्पे होते. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या 284 लाभार्थींना एकूण 23 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. 

ते म्हणाले, हवामानातील बदलाचा होत असलेला परिणाम आता स्विकारावाच लागेल. नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टीने होणाऱ्या नुकसानीला शासनाची मदत पुरेल अशीही परिस्थिती नाही. यासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना चांगल्या पध्दतीने अंमलात आणणे हेच उत्तर आहे. या योजनेतील निकष शासनाने बदलल्याने बहुतांशी शेतकरी शासकीय मदतीपासुन वंचित राहत आहेत.

फळबागांच्या संदर्भातही या योजनेच्या मदतीचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळेच हवामानावर आधारित पिक विमा योजनेतील बदलांबाबतच्या शिफारशी राज्य आणि केंद्र सरकारकडे आपण करणार आहोत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला संरक्षण देणे हे व्यवस्थेचे कर्तव्यच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना मदत झालीच पाहीजे. शेतकऱ्यांना कोणताही पक्ष नाही असे सांगून, विखे पाटील यांनी गावपातळीवरच तरुणांनी एकत्रित येवून कृषि क्षेत्रातील नवीन प्रयोग सुरु केले पाहीजे असे मत व्यक्त केले. 

दूग्ध व्यवसायातील गुणवत्ता टिकावी म्हणुन योग्य मार्गदर्शन होत नसल्याची खंत व्यक्‍त करुन, याबाबत शासकीय स्तरावर उदासीनता दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती तसेच कोवीडचे संकट या काळात सर्वच अधिकाऱ्यांनी चांगल्या पध्दतीने काम केले. योग्य पंचनामे झाल्यामुळेच या मदतीचे धनादेश लाभार्थ्यांना मिळाले. उर्वरित नुकसानग्रस्तांनाही तातडीने मदत मिळवी यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी जाहीर झालेल्या मदतीचा आढावा घेवून यातून दिलासा देण्याची जबाबदारी सरकार पार पाडत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक तहसीलदार अमोल निकम यांनी केले. या वेळी ज्येष्ठ नेते रघूनाथ शिंदे एकनाथ नागरे, रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, निवृती सांगळे, रखमा खेमनर, भागवत उंबरकर, शांताराम शिंदे, गोकुळ दिघे आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT