The Ghatghar project affected tribal farmers movement was a success 
अहिल्यानगर

घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘का’ मिळाले यश

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : आपल्या हक्काच्या मागण्यासाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. कारण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे.

घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी हक्काच्या मागण्या संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेतीचा मोबदला द्यावा, घरटी एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी व शेतीसाठी लव्हाळवाडी केटी वेअर मधुन पाणी द्यावे इतर मागण्यासाठी सतत आंदोलन सुरू होते. मात्र सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने 5ऑगस्टला प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करत विद्युत निर्मिती बंद केली.

त्यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी आंदोलनकर्त्याना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत लोकप्रतिनिधी अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य अभियंता अधिक्षक अभियंता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व सबंधित अधिकारी, देविदास खडके, लक्ष्मण गांगड यांच्यात बैठक झाली.

आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती देविदास खडके यांनी दिली. या आदिवासी शेतकरी प्रकल्प ग्रस्त शेतकरी आंदोलन कर्त्यानी आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुरावा मिळालेले यश आहे धोंडीबा सोंगळ यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT