MLA Rohit Pawar criticizes BJP over Bihar elections 
अहिल्यानगर

नितीश कुमार बोध घेतात की घात पचवतात, हे पहावं लागेल

अशोक मुरुमकर

अहमदनगर : संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीचे अधिकृत निकाल बुधवारी (ता. ११) पहाटे जाहीर झाले. यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सर्वाधिक जागा आरजेडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे खरे बाजीगर तेजस्वी यादव ठरले आहेत.

नितीशकुमार यांचा पक्ष तीन नंबरला पडला असला तरी ते मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आहे. यामध्ये बाजीगर ठरलेले तेजस्वी वादव यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘खरे हिरो’ म्हणत त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर भाजपवर त्यांनी टीका केली आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली तेव्हापासूनच सर्वत्र काट्यांवरची टक्कर सुरू होती. रात्री उशीरापर्यंत कोणालाही काही अंदाज येत नव्हता. मात्र मंगळवारी मध्यरात्रीनंतर एनडीएला बहुत मिळेले असे चित्र स्पष्ट दिसत होते. शेवटपर्यंत येथील निकालामध्ये उत्सुकता होती. मात्र सकाळी महागठबंधन मागे पडले ते पुढे आलेच नाही. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात काहीवेळा दोन- तीन जागांचा फरक होता. त्यामुळे कोणत्याही गटाकडून जल्लोष केला जात नव्हता. यामध्ये सुरुवातीपासूनच एनडीएकडून नितिशकुमार यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर होते. तर महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी होते. मात्र, या लढतीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या तर महागठबंधनला ११० जागा मिळाल्या. त्यामुळे तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले. असे असले तरी आरजेडीला ७५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे खरे हिरो यादवच झाले असल्याचे मानले जात आहे.

भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत तर जेडीयूला फक्त ४३ जागा मिळाल्या. तीन नंबरच्या जागा मिळाल्या असतानाही ते मुख्यमंत्री होणार का याकडे लक्ष लागले आहे. भाजपने नितिशकुमारच मुख्यमंत्री होतील असं जाहीर केले असले तरी नितिशकुमार यांना काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नितिशकुमार यांच्या जेडीयूच्या जागा कमी येण्यास भाजपच कारणीभूत असल्याचे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या सर्वाधिक जागा आल्याने शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. 

रोहित पवार यांनीही ट्विट करत म्हटलं आहे की, ‘बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत. त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. 

यातून बोध घेऊन नितिशकुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT