Obligation to spend 50% of the funds for sanitation and water supply 
अहिल्यानगर

कोरोनामुळे सरकारचा नवा आदेश नि ग्रामपंचायतींची पळापळ

राजेंद्र सावंत

पाथर्डी : ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाचा 50 टक्के निधी स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी खर्च करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पूर्वी केलेले विकासआराखडे बदलावे लागणार असून, त्यात आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वच्छता व पाणीपुरवठा सुविधांचा समावेश करावा लागणार आहे. 

पाथर्डी तालुक्‍यात 107 ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील सुमारे सहा कोटी रुपये पाणी व स्वच्छता यावरच खर्च करावे लागणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने हा नवा आदेश काढला. ग्रामपंचायतींनी 2020-21 सालासाठीचे वित्त आयोगाच्या निधीतील विकासआराखडे तयार केले होते. 

विकासआराखड्यात बदल 

डिसेंबरमध्ये ते सरकारच्या संकेतस्थळावर टाकले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा कहर सुरू झाला नि राज्य सरकारने गावच्या विकासकामांत काही बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यात ग्रामपंचायतीला चौदाव्या वित्त आयोगाचा 50 टक्के निधी स्वच्छता व पाण्यावरच खर्च करण्याचे बंधन घातले. त्यामुळे ग्रामपंचायतींनी यापूर्वी केलेल्या विकासआराखाड्यात आता बदल करावा लागेल. नव्याने आराखडे तयार करण्याची सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीला केली आहे. 

नवीन आराखडे तयार 

पंचायत समितीनेही ग्रामसेवक व सरंपचांना सांगुन विकास आराखडे बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायतींनी विकास आराखडे बदलून स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, गटारी, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, पाणीवितरण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन करणे, हागणदारीमुक्त गाव आदी कामात आणखी प्रगती करणे, अशा विविध कामांचा समावेश करुन नवीन आराखडे तयार केले आहेत. 

निधी मिळताच काम सुरू 

ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाचा 50 टक्के निधी हा स्वच्छता व पिण्याचे पाणी, यासाठी खर्च करण्याचा सरकारचा आदेश आहे. त्याचा गावात काम करताना चांगला फायदा होईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. आराखडे तयार करुन नवीन कामे सुचविली आहेत. निधी मिळेल तेव्हा कामाला सुरवात करू. 
- सचिन नेहुल, सरपंच, जवखेडे दुमाला 

सहा कोटी खर्चासाठी मिळणार 

चौदाव्या वित्त आयोगाच्या खर्चाबाबत शासनाचा आदेश मिळाला आहे. 12 कोटी निधीतील सुमारे सहा कोटी रुपये स्वच्छता व पिण्याच्या पाण्यासाठी मिळणार आहेत. स्वच्छतेच्या कामाला व आरोग्य विषयावर गावपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहेत. विकासकामात सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी संघटितपणे काम केल्यास, गावातील आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न सुटतील. 
- सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी, पाथर्डी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT