Rohit Pawar reply to BJP on Supreme Court verdict in Sushant Singh case 
अहिल्यानगर

भाजपच्या नेत्यांना साष्टांग दंडवत... अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही; या नेत्याकडून भाजपला त्यांच्या विधानाची आठवण

अशोक मुरुमकर

अहमदनगर : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोटाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात राजकीय टीकाठिपणी सुरु झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सलग चार ट्विट केले आहेत. ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही’ म्हणत ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना ‘सांष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लागावला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सरकार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयंते’ असं म्हणत ट्विट केले होते.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सलग चार ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत'. 

‘आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर 'मेरा अंगण मेरा रणांगण' या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.'

न्यायालयाच्या आदेशामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकाणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे जाताच राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. 

याबाबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ‘सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे. सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

पुढे आमदार पवार यांनी असं म्हयलंय की, शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते. याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असंही आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

Virat-Anushka Meet Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांनी विराट-अनुष्काला सांगितला रावणाच्या मृत्यूनंतरचा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

SCROLL FOR NEXT