Sickness
Sickness Sakal
अहमदनगर

Sickness : ऋतू बदलतोय, बदला आहारविहार

सकाळ वृत्तसेवा

हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा हा काळ. दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी. अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप, कफ आदी विकार वाढत आहेत.

अहमदनगर - हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा हा काळ. दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी. अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप, कफ आदी विकार वाढत आहेत. लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींनाही त्रास होत आहे. त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः आहारविहार बदलला पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

कफ वाढवणारा काळ

हिवाळा ऋतू संपताच वसंत ऋतू सुरू होतो. हवामानात थोडी थंडी आणि थोडी उष्णता असे वातावरण असते. हा काळ कफ वाढविणारा असल्याने दिवसा झोप घेणे टाळावे. सूर्याच्या तीव्र उष्णतेने मनुष्य, पशुपक्षी, वनस्पती या सर्वांमधील ओलसरपणा शोषला जाण्याने शक्ती क्षीण होते. भारतामध्ये आठ-दहा महिने उन्हाळा असल्याने जास्त काळजी घ्यावी लागते.

ऋतुबदलामुळे लहान मुले, मोठी माणसेही आजारी पडतात. या काळात मुलांना थंड पदार्थ देऊ नयेत. केळी, आइस्क्रीम, आंबट पदार्थ टाळावेत. सर्दी झाल्यानंतर डोक्यावरून अंघोळ करू नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजारी मुलांना शाळेत पाठवू नये. त्यामुळे इतरांना इन्फेक्शन होऊ शकते. आजारी पडू नये म्हणूनही काही औषधे असतात. ती डॉक्टरांच्या सल्ल्याने देता येतात.

- डॉ. सुचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ

ऋतु बदलामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. दुपारी १२ ते पाच या वेळेत फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. साखर न घातलेले रस घ्यावेत. आगामी काळात सनस्ट्रोकचीही भिती असते. त्याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. आयुर्वेदात तीन दोष सांगितलेले आहेत. वात, कफ आणि पित्त. यातला कफ शरीराच्या वरच्या भागात राहतो. त्यामुळे खोकला, अधिक झोप येणे, थंडी वाजणे अशा व्याधी दिसतात. यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आवश्यक आहे. या काळात आरोग्याची काळजी घेताना आपली दिनचर्या बदलण्याची गरज असते.

- डॉ. किशोर म्हस्के, आयुर्वेदतज्ज्ञ

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।

युक्तस्वप्नाव बोधस्य योगो भवति दु:ख।।

श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये आयुर्वेदाचे वर्णन आहे. चांगला आहार, विहार शरीरातील रोग दूर करते, असे सांगण्यात आले आहे.

हळुवारपणे करा ‘हा’ बदल

हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन होत असतात. त्यामुळे शरीर गरम (उबदार) ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थ आपल्या जेवणात असणे गरजेचे असते. आरोग्यासाठी पूरक ऋतू म्हणून हिवाळा महत्त्वाचा आणि फायद्याचा असतो. हिवाळ्यात पचनक्रिया सुधारते. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT