राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार e sakal
अहिल्यानगर

'कुकडी'च्या बोगद्याचा प्रश्नावर तीन आठवड्यात तोडगा : शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील कुकडी पाणीप्रश्न सोडविण्यासंदर्भात नव्या पिढीने आग्रह धरला आहे. माणिकडोह ते डिंबे या धरणादरम्यान बोगदा त्यात महत्वाचा आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेऊन विस्तृत चर्चा केली आहे. काही दिवसात तिसऱ्यांदा बैठक घेवून येत्या तीन आठवड्यात 'कुकडी'च्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (रविवारी) झाले. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. या प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगर विकासमंत्री प्राजक्त तनपुरे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पवार यांनी कुकडीच्या पाणीप्रश्नात लक्ष घालून, कायमस्वरूपी तोडगा काढावा असे आवाहन केले.

हा धागा पकडत शरद पवार म्हणाले, नगर जिल्ह्यात पाणीप्रश्नावर नेहमीच वाद होतात. हा प्रश्न मोठ्याप्रमाणात चर्चिला जातो. लग्न समारंभातही आशिर्वाद देताना नेते भाषणे करतात आणि त्यातही पाण्याचा अन्यायावरच बोलतात. कुकडीच्या पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सांगितले. त्यानंतर सर्वच नव्या पिढीने आग्रह धरला आहे. कुकडी पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी यापूर्वी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेतल्या आहेत.
या बैठकांमध्ये या कुकडी प्रकल्प समूहातील अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर विस्तृत चर्चा झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत जलसंपदा विभागाची पुन्हा एकदा बैठक घेऊन तीन आठवड्यात या कुकडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू, असे ते म्हणाले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही हा प्रश्न छेडीत म्हणाले, या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत आहोत. त्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये अडचणी व उपाययोजनांवर विस्तृत चर्चा झाली असून पुन्हा एकदा बैठक घेऊन मार्ग काढणार आहोत. या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून या भागाला अधिकाधिक पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

पुणेकरांचे पाटील पाहतील

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, नगर जिल्ह्यातील कुकडी पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. हा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्धार जयंत पाटील यांनी केला आहे. त्यासाठी पुणेकरांचे कसे करायचे आणि नगर जिल्ह्याला पाणी कसे द्यायचे हे पाटील पाहतील असे सांगताच लोकांमध्ये हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Fake Currency Racket : पोलिस हवालदारानेच चहाच्या दुकानात छापल्या १ कोटींच्या बनावट नोटा; सांगली, कोल्हापूरमध्ये खळबळ

Auto Accident: ऑटो उलटल्याने महिलेचा मृत्यू; चार महिला जखमी, रेमंड बोरगाव पेट्रोल पंपजवळील घटना

Maharashtra SSC HSC Exam Fee Hike: दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ; पालकांच्या खिशाला बसणार झळ

Women Entrepreneurship : शिवणकाम ते स्टार्टअप! उद्योजिका जागृतीचा फॅशन डिझायनिंग व्यवसायाचा थक्क करणारा प्रवास

Uddhav Thackeray: मी आरशात बघतो; तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा! उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर

SCROLL FOR NEXT