In Shrigonda, a girl will get Rs 50,000 from FD 
अहिल्यानगर

मुलगी जन्माला आली, नो टेन्शन! प्रत्येकीला एफडीतून मिळणार ५० हजार

संजय आ. काटे

श्रीगोंदे : पूर्वी घरात मुलगी जन्माला आल्यापासून तिचा वनवास सुरू व्हायचा. तिच्या लग्नाची चिंताही पालकाला सतवायची. काही जण तर तिला जन्माला येण्यापूर्वीच संपवून टाकायचे. त्यामुळे जन्मदर घटत गेला. मुलींच्या घटत्या संख्येमुळे आता वेगळीच समस्या उभी राहिली आहे. मुलांना लग्नासाठीही मुली मिळेनात अशी अवस्था आहे.

मुलींच्या जन्मदराचा टक्का वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही सामाजिक संघटनाही पुढे आल्या आहेत. श्रीगोंद्यातील रोडे अर्बन मल्टीपर्पज बँकेने तर दोन पाऊल पुढे टाकले आहेत.

श्रीगोंदा तालुक्‍यात आगामी वर्षात (8 मार्च 2021 ते 8 मार्च 2022) जन्म घेणाऱ्या मुलींसाठी शहरातील रोडे अर्बन मल्टिपर्पज बॅंकेने गुड न्यूज आणली आहे. "राजकन्या' नावाने ही योजना असेल. 

योजनेचा असा असेल कालावधी

बॅंकेचे अध्यक्ष संतोष रोडे म्हणाले, ""श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घसरला आहे. मुलींचा जन्मदर वाढला तरच भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी रोडे अर्बन मल्टिपर्पजने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्‍यात पुढच्या 8 मार्चपर्यंत (2022) जन्म घेणाऱ्या मुलीच्या नावे आमची बॅंक स्वत: एक एफडी करणार आहे.

ही कागदपत्रे लागतील

ती मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला पन्नास हजार रुपये मिळतील. ज्यांच्याकडे केशरी व पिवळी शिधापत्रिका आहे, त्यांनाच या योजनेत भाग घेता येईल. त्यामुळे सामान्यांना योजनेचा फायदा मिळेल.'' यादरम्यान जन्म घेणाऱ्या मुलीचा जन्मदाखला व आई-वडिलांचे छायाचित्र दिले, की योजनेत त्या मुलीचा समावेश होईल, असेही रोडे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT