नगर, : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्याला शालेय साहित्याची गरज असते. शालेय साहित्यापासून कुठलाही गरजू विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शहरातील विद्यार्थ्यांना 50 हजार वह्यांचे वाटप करणार आहे.
कोरोना संकटामुळे घरी राहून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. अभ्यासातूनच विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व घडते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार जगताप यांच्यातर्फे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना 50 हजार वह्यांच्या वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, विलास कराळे, गोरख खांदवे, मीना कराळे व विद्यार्थी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, की शहरातील जनतेने वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छांऐवजी शालेय साहित्य द्यावे. या आवाहनाला शहरातील मित्रपरिवार, विविध सामाजिक संस्था, तसेच जनतेने प्रतिसाद देत शालेय साहित्य देण्याचे काम केले.
गरजूंना या साहित्याचे वाटप सुरू केले आहे. कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला शालेय साहित्याची कमतरता भासू देणार नाही, असे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.