Three days public curfew in Kolhar Bhagwatipur
Three days public curfew in Kolhar Bhagwatipur 
अहमदनगर

कोल्हार भगवतीपूरमध्ये तीन दिवस जनता कर्फ्यू

सुहास वैद्य

कोल्हार : मागील काही दिवसांपासून गावात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता, कोल्हार भगवतीपूर गावामध्ये 26 ते 28 मार्च असा तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ऍड. सुरेंद्र खर्डे 
यांनी सांगितले. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हार, भवतीपूर ग्रामपंचायती, आरोग्यविभाग व व्यापाऱ्यांची आज तातडीची बैठक घेण्यात आली. तीत कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेवून जनता कर्फ्यूचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 

बैठकीला कोल्हारच्या सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपूरचे सरपंच दत्तू राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप, व्यापारी संघटनेचे 
अध्यक्ष सुधीर खर्डे, उपाध्यक्ष अनिल बांगरे, संजय शिंगवी, गोरक्षनाथ खर्डे, अमोल खर्डे, दिनकर खर्डे, श्रीकांत बेद्रे, अरुण निबे, शिवाजी निकुंभ, शिवकुमार जंगम, पप्पू मोरे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

ऍड. खर्डे यांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन केल्यास जागेवर दंड करण्यात येईल, असा इशारा दिला. 

डॉ. संजय घोलप यांनी रुग्ण वाढत असल्याने बेड मिळणे अवघड झाले आहे. जे निकषात बसतात, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, या त्रिसूत्रीचा वापर करावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT