Toxic substances have been dumped in public water supply wells in Hanumanwadi area 
अहिल्यानगर

हनुमानवाडीवर विषप्रयोग, गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरीत कालवले विष

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील भोकर येथील हनुमानवाडी परिसरातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत अज्ञात समाजकंटकांनी विषारी पदार्थ टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सदर विहिरीतील पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर विहिरीजवळील एका शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
 
भोकर शिवारातील हनुमानवाडी परिसरातील बिरदवडेवस्ती, अभंगवस्ती, कांबळेवस्ती, जाधववस्ती, भोईटेवस्ती, विधाटेवस्ती, पटारेवस्त्यांसाठी पिण्याचे पाणी सदर विहिरीतून पुरवठा केला जातो. काल काही शेतकरी सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीसमोर काम करीत असताना त्यांना विहिरीच्या इंजिनसमोर काही बाटल्यासह इतर साहित्य आढळून आले.

संबंधित शेतकरी विहिरीत डोकावला असता, त्यांना विहिरीच्या पाण्यावर शेकडो मासे मृतावस्थेत दिसले. तसेच पाण्यावर विशिष्ट प्रकारच्या द्रवाचा तवंग आल्याचा दिसुन आला. त्या शेतकऱ्याने तात्काळ उपसरपंच राधाकिसन विधाटे यांना माहिती दिली. त्यांनी आरोग्य सेवक प्रदीप गवई यांच्या मदतीने पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला.

प्राथमिक तपासणीत पाण्यात विषारी द्रव मिळाल्याचा निष्कर्ष निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने सदर विहिरीचा पाणी पुरवठा थांबविला. तसेच ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी विहिरीतील पाणी उपसा करून विहिरीच्या स्वच्छतेच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT