58 crore 32 lakh loss to farmers
58 crore 32 lakh loss to farmers 
अकोला

शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाखांचे नुकसान

विकास खिलारी

अकोला - जिल्ह्यात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ७७ हजार ७४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाख २४ हजार ३३६ रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. नदी, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने काही भागातील शेती खरडून गेली. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानामुळे कंबरडेच मोडले. जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत ३५५.१ मि.मी. (५१.६ टक्के) पावसाची नोंद झाली. याच दरम्यान अतिवृष्टी, वीज, वादळामुळे जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला. त्यासोतबच जिल्ह्यातील २२२ घरांचे अंशत: तर दोन घराचे पूर्णत: नुकसान झाले. संबंधीत नुकसानीचे तालुकास्तरावर पंचनामे व मूल्यांकनाची कार्यवाही गत काही दिवसांपासून सुरू होती. वीज व अतिवृष्टीचा जनावरांनाही फटका बसला. त्यामुळी जिल्ह्यातील ११ जनावरांचा मृत्यू झाला.

शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिके व खरडून गेलेल्या शेत जमिनीचे पंचनामे करण्याची कारवाई ग्राम विकास, महसूल व कृषी विभागामार्फत करण्यात आली. त्यानुसार ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे ५८ कोटी ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

असा बसला क्षेत्रनिहाय फटका

  • काेरडवाहू ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५१४ गावे बाधित झाली आहेत, तर ७५ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रावरील काेरवाहू पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५१ काेटी ५७ लाख ३ हजार ६३६ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

  • बागायती ः जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातील १०१ हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाली असून, १२४ गावातील पिके बाधित झाली. यासाठी किमान १३ लाख ६६ हजार २०० रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे.

  • फळ ः जिल्ह्यातील ८२.७५ हेक्टर क्षेत्रातील फळांची हानी झाली असून, यासाठी १४ लाख ८९ हजार ५०० रुपयांच्या निधीची गरज आहे.

१ हजार ७०० हेक्टर जमीन गेली खरडून

अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे १ हजार ७२४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. ही जमिन ३५ गावातील आहे. त्यामुळे ४ हजार ५६६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी किमान ६ काेटी ४६ लाख ६५ हजारांचा निधी अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT