Akola crop insurance sanctioned but farmers deprived of benefits, Union Minister of State appeals to farmers in villages for justice
Akola crop insurance sanctioned but farmers deprived of benefits, Union Minister of State appeals to farmers in villages for justice 
अकोला

पीकविमा मंजूर तरीही शेतकरी लाभापासून वंचित, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावातील शेतकऱ्यांची न्यायासाठी याचना

अनुप ताले

अकोला  ः प्रधानमंत्री शेतकरी पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा मंजूर झाला पण, अजूनपर्यंत विम्याची रक्कम मिळालीच नाही; केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या गावातील व महसूल मंडळातील 930 शेतकऱ्यांनी अशी व्यथा मांडली असून, न्याय मिळविण्यासाठी ते ग्रामपंचायत कार्यालयात आंदोलनाला बसले आहेत.

प्रधानमंत्री पीकवीमा योजना 2019-20 मध्ये जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन पीकविमा भरला होता त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना पीकविमाची रक्कम त्यांच्या पासबुकमध्ये जमा झाली. परंतु, कौलखेड जहॉंगीर, बाहदरपूर, दताळा, वाहीतपूर, दताळा, पळसो, दहीगांव या गावातील जवळपास 930 शेतकऱ्यांची रक्कम गेल्या पाच महिन्यापासून त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाली नाही.

विषेश म्हणजे पीकविम्यापासून वंचित हे सर्व शेतकरी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या गावातील व महसूल मंडळातील आहेत. या समस्येविषयी व न्यायमागणीसाठी या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडे वेळोवेळी निवेदने केली. परंतु, अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून (ता.27) कौलखेड जहॉंगिर येथील ग्रामपंचायत कार्यालयातच आंदोलन सुरू केले आहे.

...तर संजय धोत्रे यांच्या घरासमोर ठिय्या देऊ
प्रधानमंत्री पीकवीमा योजना ही केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी याबाबत दखल घेतली तर, हा प्रश्‍न नक्कीच मार्गी लागू शकतो, असा विश्‍वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल आताही घेण्यात आली नाही तर, संजय धोत्रे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे केली मागणी
पीक विम्याची रक्कम मिळाली नाही याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आमदार यांचेकडे निवेदने सादर करून न्यायाची वेळोवेळी मागणी केली. मात्र कोणाकडूनही दाद मिळाली नाही. त्यामुळे आंदलनाची भूमिका घ्यावी लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कोणाची चुकी कोणाला शिक्षा!
पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांनी भरली परंतू ती विमा कंपनीकडे भरण्यात आलीच नाही. त्यामुळे पीकविमा मंजूर झाल्यानंतरही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. बॅंक आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा शेतकऱ्यांना नाहक भोगावी लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT