PM Kisan Sanman Nidhi yojana esakal
अकोला

Akola : जिल्ह्यातील २४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण!

पीएम-किसानचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील ८३ हजार १४ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) लाभ मिळण्याचा मार्ग खडतर झाला होता. त्यामुळे ई-केवायसी रखडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. सदर डेडलाईनमध्ये जिल्ह्यातील २४ हजार ९७६ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता सदर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

जिल्ह्यातील जवळपास दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८३ हजार १४ शेतकऱ्यांचे बॅंक खाते आंधार संलग्न असल्याने त्यांच्या बॅंक खात्यात सात सप्टेंबरनंतर योजनेअंतर्गत देण्यात येणारी किस्त देण्यात येणार नाही, असा इशारा शासनामार्फत देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत युद्धस्तरावर ई-केवायसीची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यातील जवळपास २४ हजार शेतकऱ्यांची ई-केवीयसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Latest Marathi News Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

Indigo Issues: मतभेद, अंतर्गत अस्थिरता अन्... देशातील सर्वात मोठी एअरलाइन संकटात! इंडिगोचा मालक कोण? समस्यांनी का वेढलं? वाचा...

Digital Banking : डिजिटल बँकिंगचे नवे नियम 1 जानेवारीपासून लागू! तुमच्या ऑनलाइन बँकिंगमध्ये काय बदलणार?

SCROLL FOR NEXT