Akola farmer Soybean sowing sakal
अकोला

अकाेला : गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनचा पेरा अधिक

जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवर लागवड

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक झाले असून यावर्षी जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ६०० हेक्टर वर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. यावर्षी गतवर्षी पेक्षा जास्त अष्टसूत्रीचा वापर होणार आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला असून खरीप पेरणीची लगबग वाढली आहे. काही ठिकाणी तर पेरणीला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक झाले आहे.

हमखास उत्पादन देणारे पीक असल्यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होत आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्यामुळे या पिकाविषयी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. सोयाबीनची एकरी उत्पादकता सरासरी आठ क्विंटल आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सरासरी उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बीबीएफ, सरी-वरंबा बेडवर सोयाबीनची टोकण यासारखे नवनवीन प्रयोग करून सोयाबीनची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल पर्यंत नेण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. खास सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांनी मागील वर्षी सोयाबीनची अष्टसुत्री तयार केली होता.

या अष्टसूत्रीचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळे अष्टसूत्री पाच भाषांमध्ये रूपांतरित होऊन संपूर्ण देशात पोहोचली आहे. अष्टसूत्रीचा शेतकऱ्याला कळली असून यावर्षी जवळपास सर्वच शेतकरी अष्टसूत्रीचा वापर करीत आहेत. यावर्षीही ही इतर पिकांना फाटा देत शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळला असून तालुक्यात ५८ हजार हेक्टरवर तर जिल्ह्यात ३ लाख ४ हजार६०० हेक्टर वर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.

जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. सोयाबीन बियाण्याची ५ से.मी .खोलीवर पेरणी करावी तसे केल्यास उत्पादकतेत निश्चित वाढ होते. तसेच जे शेतकरी सोयाबीन बरोबर तुरीचे आंतरपीक घेतात त्यांनी बियाणे बीजप्रक्रिया करून वरंब्यावर टोकण पद्धतीने लागवड केल्यास तूर उधळण्याचे प्रमाण कमी होऊन मर्यादित रूप संख्या असल्याने उत्पादनात चांगली वाढ होते. कृषी विभागाकडून गावपातळीवर बिज प्रक्रियेपासून तर लागवडीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे.

- शंकर तोटावार,जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Alcohol Tree : ऐकू ते नवलच! 'या' 3 झाडांपासून बनते दारू...लाखो लोकांना आजही नाही माहिती

INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT